YCMOU B.A Second-year MAR 210 solved Assignments 2022
MAR 210 वाड्मय प्रकारांचा अभ्यास (कथा कादंबरी)
🔹मराठी कथेच्या वाटचालीतील महत्त्वाचा कथकारंची कामगिरी स्पष्ट करा.
🔹लेखकाचा दृष्टीकोन व आशयसूत्रे यांचा संबंध विशद करा
🔹भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' या कादंबरीतील भाषाशैलीविषयी माहिती लिहा.
🔹बोधवादी कादंबरी म्हणून यमुना पर्यटन या कादंबरीचे टिपण लिहा
🔹मराठी कथेच्या वाटचालीतील महत्त्वाचा कथकारंची कामगिरी स्पष्ट करा.
उत्तर :
मराठी साहित्य किंवा मराठी साहित्य हे आपल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त साहित्यांपैकी एक आहे. अगणित दशकांहून अधिक काळ पसरलेल्या, आपल्या मराठी लेखकांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा इतक्या सुंदरपणे लिहिला गेला आहे, आणि शेवटी, संपूर्ण देशाला प्रिय आहे.
पु.ल.देशपांडे हे आपल्या राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय लेखकांपैकी एक आहेत. एक वैयक्तिक आवडता, या आश्चर्यकारक माणसाने जीवनाच्या दृष्टीकोनाबद्दल माझे मत बदलले. एक उत्तम विनोदी, महाराष्ट्रीय समाजाविषयीच्या त्यांच्या निरीक्षणांमुळे त्यांनी आपल्या सर्वांच्या हृदयात एक अमर स्थान मिळवले आहे. व्यक्ती आणि वल्ली, आसा मी असामी आणि बतात्याची चाल हे माझे आवडते काम.
एक शिक्षक आणि संपादक, शिवाजी सावंत हे आणखी एक दिग्गज मराठी लेखक आहेत जे त्यांच्या ऐतिहासिक पात्रांच्या सुंदर आणि काव्यात्मक रेखाटनांसाठी ओळखले जातात. मृत्यूंजय हे त्यांचे पुस्तक जगभर प्रिय आहे; कर्णाची अप्रतिम कथा त्याच्या शब्दांतून आणखी छान होते. युगंधर, कवडसे आणि छावा ही इतर उल्लेखनीय पुस्तके आहेत.
अनेक प्रतिभांचा माणूस, विजय तेंडुलकर त्याच्या राजकीय आणि सामाजिक नाटकांसाठी मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो. ते एक लेखक होते, त्यांनी सिनेमा उद्योगात काम केले होते आणि एक उत्कृष्ट सामाजिक भाष्यकार म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांचे सर्वात प्रसिद्ध काम- घाशीराम कोतवाल- अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे आणि ते नाट्यकृती म्हणून ओळखले जाते. इतर प्रतिष्ठित कामांचा समावेश आहे - मौन! कोर्ट इज इन सेशन आणि द मंथन.
वसंत पुरुषोत्तम काळे, प्रामुख्याने वा पु काळे म्हणून ओळखले जाणारे, एक मराठी निबंधकार होते ज्यांनी लघुकथा, पुस्तके आणि जीवनाचे अचूक चित्रण केले. व्यवसायाने वास्तुविशारद असले तरी, त्यांच्या शब्दांच्या देणगीने आपल्या देशाला जवळपास साठ आश्चर्यकारक पुस्तके दिली. हाय वाट एकतीची, पार्टनर आणि वपुआरझा हे सर्वात प्रतिष्ठित काम असेल.
विष्णू वामन शिरवाडकर, किंवा कुसुमाग्रज, एक प्रसिद्ध मराठी लेखक, लघुकथा लेखक, निबंधकार आणि एक अविश्वसनीय कवी होते. किंबहुना, लोक त्यांना मराठी साहित्य विश्वातील महान कवी मानतात. नटसम्राट आणि विशाखा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कामे.
🔹लेखकाचा दृष्टीकोन व आशयसूत्रे यांचा संबंध विशद करा
उत्तर :
तुम्ही कोणत्या विषयावर बोलत आहात हे महत्त्वाचे
नाही, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही त्याकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून (POV) पाहता. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्ही विषयाच्या बाजूने आहात, त्याच्या विरोधात आह किंवा अगदी तटस्थ आहात. ज्याप्रमाणे तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी पीओव्ही आहे, त्याचप्रमाणे ग्रंथांचे लेखकही आहेत. विशेषत: गैर-काल्पनिक मजकूरांमध्ये, आपण लेखकाच्या लेखनाच्या विविध पैलूंचा वापर करून ते विषय कसे पाहतात हे निर्धारित करू शकता. या पैलूंमध्ये लेखकाची शब्द निवड, वाक्प्रचार आणि त्यांनी समाविष्ट करण्यासाठी निवडलेली सामग्री समाविष्ट आहे.
___________
दुतोंडी मनोवृत्तीला चपराक
सध्याचा काळ हा वैचारिक दुष्काळाचा काळ मानला जातो. जे विचारवंत सध्या अस्तित्वात आहेत ते जुन्याच विचारांच्या व्युहात गोल गोल फिरताना दिसतात आणि त्यांनाही पुढे न नेता उलट गढूळ करण्याच्या प्रयत्नात लागलेले दिसतात. त्यामुळे की काय किंवा वैचारिक अनारोग्याची कोरोनासारखी साथ आलीय म्हणून की काय आजचे समाजजीवनही उथळ विचारांवर आरुढ झालेले आहे. त्यात समाजमाध्यमांमुळे सहज अभिव्यक्तीची संधी मिळत असल्यामुळे झटपट विचारवंत होणेही सोपे झाले आहे आणि यातुनच अविचार्यांची झुंडशाही फोफावत असल्याचे चित्र आपल्याला दिसते; पण त्यावरही विचार करत मार्ग काढण्याची प्रवृती कोणात राहिली नसल्याने वैचारिकतेचाच समूळ र्हास होतो आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. समाजात जर काही न्यून असेल तर त्याचे मुख्य कारण प्रगल्भ, अग्रगामी आणि बहुआयामी परिवर्तनवादी विचारांचे सहअस्तित्व यांचा अभाव असणे हे असते.
परंतु आपल्याकडे मुळातच वैचारिक दुष्काळ असलेल्या काळात घनश्याम पाटील या तरुण संपादकाचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दरवळ’ हे पुस्तक एखादी का होईना वैचारिक सर आल्याचा दिलासा देते. विविध लेखांतून विचारांना प्रवृत्त करते. अविचारावर कोरडे ओढते. गतकाळातील स्वामी विवेकानंदांसारख्या महनीय व्यक्तींबाबत आदर दाखवताना त्यांच्यापासून नेमके काय विचारमूल्य घ्यायचे हे सांगत ते पुढे काय या प्रश्नाला भिडतात आणि नवी विचारवाट निर्माण करण्यासाठी सज्ज होतात. ‘दरवळ’ पुस्तकातील पंचवीस लेखांपैकी बव्हंशी लेख हे सामजिक तळमळीतुन अगदी आतून आलेले आणि नवविचारांच्या पालवीने फुलारले गेलेत.
समाजमाध्यमांच्या विस्फोटामुळे प्रतिक्रियावादाला उधाण आलेले आहे हे आपण पाहतो. ट्रोल केले जाणे हे आता सामान्य लेखकांबाबतही होऊ लागलेले आहे. प्रत्येक दुर्दैवी घटनेत आधी पिडिताची जात पाहणे ही विकृती सार्वत्रिक झाली आहे. त्यावरही पाटील विवेचन करतात. ते तरुण आहेत. शैली अनेकदा आक्रमक होते पण त्यामागील कळकळही सहज लक्षात येत असल्याने कोणालाही राग येणार नाही. स्वत: प्रकाशक असूनही ते ‘साहित्यिक दहशतवाद’ या मराठीत गेल्या दोनेक दशकांत उद्भवलेल्या अपप्रकारावरही तुटुन पडतात आणि ‘साहित्यिक जीवनव्रती निर्माण व्हावेत’ या लेखातुन ते साहित्यिकांसाठीच काही मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.
पुण्यात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून विटंबित करण्यात आला. मी तेव्हा या प्रकाराला माध्यमांतून-भाषणांतून ‘तालीबानी’च म्हटले होते. मागे एकदा वारकर्यांनी ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीवरुन ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादवांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊनही त्यांना संमेलनालाच उपस्थित राहू दिले नव्हते. ती कादंबरीही मागे घ्यायला लावली होती. साहित्यिक कलाकृतींची चिकित्सा, समीक्षा करण्याचे वा ते वाचण्या-न वाचण्याचे स्वातंत्र्य लोकाना उपलब्ध असताना जेव्हा असे प्रकार घडतात ते आमचा वैचारिक इंडेक्स किती ढासळलेला आहे याची चुणूक दर्शवतात. यादव प्रकरणात भलेभले मराठी सारस्वत मूग गिळुन बसले होते. तेव्हा फक्त मी आणि पाटील यांच्यासारखे मोजके अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या महत्तेबद्दल बोलत वारकर्यांच्या तालीबानी वर्तनाचा निषेध केला होता. राम गणेश गडकरींनाही जातीय कोंदणात अडकावण्याचा प्रयत्न झाला.
औंरंगजेबाचा भाऊ दारा शुकोहलाही केवळ धर्माच्या चौकटीत ढकलत त्याला शक्यतो अज्ञातातच ठेवण्याची प्रवृत्ती नवी नाही. शेख महंमदासारखे संतकवी दुर्लक्षित तर राहतातच पण समर्थ रामदासांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची महती सांगणारी मुसलमानी अष्टकेही विस्मृतीत ढकलली जातात कारण रामदासांना बहाल केलेल्या हिंदुत्त्ववादी प्रतिमेशी ते विसंगत आहेत. ही साहित्यिक, कवी, संतांशी प्रतारणा आहे याचे भान मात्र कोणाला नसते. ‘दरवळ’मधील ‘ही तर मेकॉलेचीच अवलाद!’ या लेखात गडकरी पुतळा विटंबनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात काही जातीय कट्टरतावादी संघटनांच्या असल्या समाजविघातक कृत्यांवर कोरडे ओढलेले आहेत.
‘राहिले’लं राहूच द्या!’ या लेखातुन घनश्याम पाटील यांच्या मराठवाड्यातील किल्लारी या भूकंपग्रस्त भागातून येऊनही कमी वयात केलेल्या संघर्षाची हृद्य कथा येते पण त्यात जी उमेद, आकांक्षा आणि साहित्यात काहीतरी नवे करेल ही जी उमेद दिसते तिला तोड नाही. किंबहुना पाटील असे कसे घडले याचे मानसशास्त्रीय विवेचन त्यातून सहज करता येते. पुस्तकातील काही लेख हे खरे तर लेखाचे विषय नसून त्यावर हीच भूमिका कायम ठेवत सैद्धांतिक मांडणी करणारी स्वतंत्र पुस्तके होऊ शकतील असे आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि प्रतिक्रियावाद्यांचा दहशतवाद हा एक असा विषय होऊ शकतो. ही प्रवृत्ती आता धोक्याची पातळी ओलांडून चुकली आहे. त्याचे सखोल विवेचन होणे आवश्यक आहे.
घनश्याम पाटील यांचा एक दृष्टीकोन आहे. प्रत्येक लेखकाचा दृष्टीकोन त्याचे समाज-सांस्कृतिक पर्यावरण आणि स्वत:चे आकलन यातून विकसित होत असतो. साहजिकच त्यात त्याचे स्वपण डोकावतेच. अनेक लेखक या स्वचा हात सोडून कोणा तथाकथित महान विचारवंत-लेखक-कवींच्या प्रभावाखाली येतात आणि स्व-विचारांची हत्या करतात हे अलाहिदा पण हे लेखन घनश्याम पाटील यांच्या स्व वर कोणाचाही प्रभाव नाही ही बाब ठळक करते. राहिला प्रश्न त्यांनी घेतलेल्या दृष्टीकोनाचा. तो वेगळा असला तरी समाजाप्रती असलेल्या आस्थेतुन, कळवळ्यातुन आला आहे आणि मुळात त्यांची शैलीच संवादात्मक असल्याने ती थेट भिडते. यातील विचारांना विरोध करायचा असेल तर तो तेवढ्याच वैचारिकतेतुन करावा लागेल. सर्व वाचकांनी आपापल्या परीने या पुस्तकातील वैचारिक दिशादिग्दर्शनाची आपापल्या मगदुराप्रमाणे मीमांसा करत पुढील वाटचाल ठरवावी अशी अपेक्षा आहे.
आम्हाला सर्वच वाईटाचा विरोध करावा लागेल. सर्वच गोष्टींचे विश्लेषण तटस्थपणे करावे लागेल. नाहीतर ब्रिगेडने हल्ले केले, तोडफोड केली तर ते तालीबानी आणि एम. एफ. हुसेनच्या चित्रांची नासधुस करणारे बजरंगदलीय संस्कृती रक्षक असले सरधोपट सापेक्ष आकलन करुन आम्हाला चालणार नाही आणि नेमका हाच आशय ‘दरवळ’मधून आला आहे. खरे तर ही आमच्याच दुतोंडी प्रवृत्तीला एक चपराक आहे. त्याच वेळेस तरुण आपल्या समाजाच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहेत याचाही हा एक आरसा आहे जो तथाकथित ज्येष्ठांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे.
🔹भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' या कादंबरीतील भाषाशैलीविषयी माहिती लिहा.
उत्तर
“कोसला” मुळात नेमाडेंची ओळख सुरु होते ती येथून. कोसला म्हणजे कोष ज्यात एक जीव धडपडून मोठा होण्याचा प्रयत्न करतो. १९६३ साली नेमाडेंनी वयाच्या २५ व्या वर्षी हि कादंबरी लिहली आणि अल्पवधीत ती खूप प्रसिद्ध झाली. लेखनाची साचेबंद चौकट मोडून केलेलं लेखन अप्रतिम वाटत. हि कादंबरी नेमाडेंच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये पांडुरंग सांगवीकर नावाचा नायक आपल्या शालेय जीवनापासून ते कॉलेज जीवन आणि त्यानंतर गावाकडील काही वर्ष हे सर्व आपल्या कादंबरीत मांडलेले आहे.
एक युवक ज्याला गावाकडील निरुत्साही वातावरण न आवडणारा त्याला त्याबद्दल वाटणारा तिटकारा, पण तरीही गावासाठी काहीतरी थोर करावं असं त्याच स्वप्न. पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधील. आणि त्यात बरीच केलेल्या उठाठेवी जसे कॉलेजच्या निवडणुकीत मित्राच्या सांगण्यावरून भाग घेणे, स्नेहसंमेलनात पुढाकार घेऊन पैसे अडकणे अश्या नाना प्रकारच्या गमती होतात आणि पुढे नीट अभ्यास करावा हा ध्यास.
मणी नावाची त्याची धाकटी बहीण आणि ती देवीच्या साथीने मरण पावते ह्या क्षणाबद्दल लेखकाने इतक्या तिडकीने लिहाल आहे कि आपल्याला हि त्या भावना जाणून येतात. कादंबरीवरील मुखपृष्ठ हे ह्याच भागावर आहे, हा भाग तर इतक्या सुंदरतेने लिहला आहे की जणू आपल्या समोर ह्या सर्व गोष्टी होत आहेत. आपल्याला त्या गोष्टी जाणवतात. रमी विषयच प्रेम आहे, बुंदी विषयी वाटणारी वेगळी भावना आहे हे नायकाने येथे ठळकपणे दर्शवल आहे.
प्रत्येक विषयावर आपली रोकठोक मते कोसला कादंबरीत लेखकाने मांडले आहेत. आई आणि वडील याती सवांद असो किव्हा कॉलेज मधील मित्र असो.
कॉलेज मधेच अर्थवट सोडून आल्या नंतर गावात बरीच शी थू होते ते सहन करत आणि गावातील काही मित्र आणि लोकांना पाहिल्यानंतर बदलेले विचार हे खर ह्या कोसलाच सार आहे. नक्की वाचून पहा अशी हि कादंबरी.
🔹बोधवादी कादंबरी म्हणून यमुना पर्यटन या कादंबरीचे टिपण लिहा
उत्तर
मराठी वाङमयेतिहासातील गेल्या 150 वर्षांतील महत्त्वाच्या पुस्तकांच्या यादीत `यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरुपण’ या बाबा पदमनजी यांच्या छोटेखानी पुस्तकाचा अग्रक्रमाने समावेश करावा लागेल. सन 1857 मध्ये ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली. अलीकडे (2005 मध्ये) तिची नवी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. वाङमयेतिहासात जरी या पुस्तकाला मराठी कादंबरीचा प्रारंभबिंदू मानले जात असले तरी, ते कादंबरी स्वरूपाचे लेखन मानता येईल किंवा कसे हा मुद्दा विवाद्य ठरला आहे.
या कादंबरीत प्रतिबिंबित झालेला वास्तववाद एका बाजूने उघडा-बोडका, तर दुसर्या बाजूने प्रचारपीडित आहे. कारण विधवाची दुःखे उघड करणे किंवा विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणे हे निमित्त घेऊन ख्रिस्ती धर्माची महती येनकेन प्रकारेण त्यात पटविली आहे. तसे करताना त्यात अतिरंजितपणा व भडकपणा शिरला आहे. यातील विषयाचा वर्तमान-संदर्भ (रेलेव्हन्स) आता उरलेला नाही. तरीही 150 वर्षांपूर्वीच्या विद्यमान स्थितीवर इतके परखड भाष्य करणे हे पदमनजींचे धाडस विस्मित करणारे होते असे निश्चितपणे म्हणता येईल. बाबांना हिंदुधर्मातील तत्त्वांचाही दाट परिचय असला पाहिजे हे स्पष्टपणे दिसून येते. या कादंबरीची भाषा तत्कालीन प्रौढभाषेचा नमुना म्हणून लक्षात घेण्यासारखी आहे. ती सहज, साधी आहे. म्हणींचा वापरही त्यांनी यथोचितपणे नि विपुल केला आहे.
0 Comments