YCMOU B.A first year MAR 102 solved Assignments 2022
🔹आशा मुंडले यांच्या निबंधातील लेखातील दिसणारी स्त्री याविषयी सविस्तर विवेचन करा.
🔹'पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व , स्वभाव , त्याची विचारपद्धती यांचे दर्शन होते' हे विधान सानेगुरुजीच्या सुंदर पात्रांमधील लेखावरून स्पष्ट करा.
🔹स्वल्पविरामचिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा.
🔹ललित साहित्याचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा?
🔹आशा मुंडले यांच्या निबंधातील लेखातील दिसणारी स्त्री याविषयी सविस्तर विवेचन करा.
उत्तर:
श्रीमती आशा मुंडले ह्या भाषाशिक्षिका आहेत. त्यांनी दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या भाषेविषयी निरीक्षणे व चिंतने ' भाषा आणि जीवन ' सारख्या पत्रिकेतून प्रसिद्ध केलेली आहेत.
भाषेच्या वापरातून व्यक्तीचं समाजातील स्थान किंवा दर्जा आपोआप व्यक्त होत असतो. श्रीमती आशा मुंडले ह्यांनी या भाषापर निरीक्षणांचा उपयोग करून समाजातील स्त्री - पुरुष समानतेचा खरपूस समाचार ह्या लक्षणातून घेतला आहे.
स्त्री - पुरुष समानतेच्या जरी आपण बढाया मारत असलो तरीही हा समाज पितृसत्ताक आहे आणि ह्यात स्त्रीला दुय्यम लेखले जाते हे त्रिवार सत्य आहे आणि हे लपविता येत नाही ये त्यांनी लय लेखातील स्त्रीच्या उदाहरणावातून स्पष्ट केलेले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखाद्या स्त्रीसाठी किती खालच्या पातळीचे शब्दप्रयोग करतो हे त्या आक्रमकतेने निदर्शनास आणून देतात.
लेखिका सांगतात , कि भाषेला जरी कवींनी 'आई' म्हटले असले तरीही त्याच भाषेचा उपयोग दुसऱ्या स्त्रीला हिणविण्यासाठी केला जातो. लेखिका पुढे सांगतात कि त्यांनी इंग्रजीत एका बाईचे वर्णन 'सेक्सी बिच ' असं वाचलं होत. त्यावेळेस त्या सांगतात कि , मराठीत, रागात प्रत्युत्तर म्हणून 'काय रे! तुला आई बहीण आहेत कि नाही?' असे विचारतो पण त्यातही 'बायको' हा शब्द नसतोच म्हणजे लेखिका निदर्शनास आणून देतात कि, जरी आपण आई बहीण ह्यांच्याप्रमाणे दुसऱ्या स्त्रीला आदराची अपेक्षा करत असलो तरीही ती अपेक्षा आपण बायकोसाठी करत नाही.
बायको हि पायातील चप्पल आहे, किंवा ती आपल्या गोठ्यातील जनावर आहे जी आपल्या ताब्यात असावी. अश्याप्रकारे संकुचित विचाराची धारणा ह्यामागे असावी असे वाटते.
ह्याचप्रमाणे, नवरा मेलेल्या विधवा स्त्रीला 'रांड ' 'छिनाल ' सारख्या अर्वाच्च शब्दात बोलून तिचा छळ करणारे नालायक , मंदबुद्धी लोक आपल्या समाजात आहेत. जी माणसं जन्माला येतात ती मारतातच पण, स्त्रीचा नवरा मेळा म्हणून तिचा नको ते शब्द वापरून छळ केला जातो
तिला अपशकुनी मानलं जातं . नव्याच्या मृत्यूची शिक्षा तिला आजन्म भोगावी लागते. नवर्याच्या मरणाने उध्वस्त झालेले जीवन पूर्णपणे नष्ट करण्यास समाज मागे-पुढे पाहत नाही.
तसेच मुलगा नसलेली स्त्री म्हणजे 'वांझ'! मुलगा नसलेल्या पुरुषाला 'वांझ पुरुष' नावाचा शब्दच सापडत नाही, म्हणजे केवढी हि स्त्रियांची हेटाळणी! भाषेला आई म्हणणाऱ्या मराठी भाषेतसुद्धा वांझ सारखे अनेक शब्द सापडतात. केवढा हा विरोधाभास आणि केवढी हि शोकांतिका.
स्त्रियांनीं लग्न करतांना कुमारिका असण्याची आत बिनधास्तपणे घातली जाते पण पुरुषांसाठी पुरुषांनी ठरवलेले श्रेष्ठत्व पुरेसे असते. स्त्री पुरुषांच्या मिलनातून जन्माला येणाऱ्या बळावर त्याच्या 'स्त्री किंवा पुरुष' असण्यावरून स्त्रीला मान आणि अपमान सहन करावा लागतो. पुत्रांची जन्मदाती स्त्री अधिक सन्माननीय तर मुलींना जन्म देणाऱ्या स्त्रीला दुय्यम नजरेने बघितले जाते.
ज्याप्रकारे पुरुष स्वतःच्या शरीराची तुलना जगातील सर्वात उच्च कोटीच्या वस्तूंशी करतात, तसे ते स्त्रियांसाठी नसते. उलट , हे स्त्रियांसाठी एक अभिशाप सिद्ध होते . स्त्रीच्या अवयवाची तुलना एखाद्या फळाच्या झाडाप्रमाणे 'छातीवरील फळ ' अशी केली जाती . एखाद्याने तिच्यावर झडप घातली , चोळमेळा केला, कुस्करले इत्यादी शब्दांद्वारे तिला एखाद्या सोप्या पद्धतीने हेरता येणाऱ्या शिकारीप्रमाणे दर्शविण्यात येते. आणि अश्याप्रकारे वर्णन करणारे पुरुषच असतात त्यामुळेच त्यांच्याबद्दल असले शब्द नाहीत. .
बायकांच्या शरीरावरुन त्यांची अक्कल त्यांच्या शरीराच्या गाडीवरून त्यांना विनोदातून हिणविल्या जाते. स्त्री म्हणजे एकदम हळवी , रडवी , दुबळी , अबोल , प्रकारची . जर ती कर्तबगार असली तर तिला 'पुरुषी ' बोलून तिच्या कर्तबगारीवर 'पुरुषी ' ठसा मारून तिला तिच्या स्त्रीपणाची हद्द लक्षात आणून दिली जाते . .
ज्याप्रकारे स्त्रीला तिच्या नवर्याच्या मरणानंतर छळले जाते तसे पुरुषांच्या बाबतीत दिसून येत नाही. ,एक गेली ( मेली) तर छप्पन मिळतील' ह्यासारखी नीच वाक्ये बोलताना कुठलेही दुःख जाणवत नाही.
'बायकांची अक्कल चुलीपुरती' 'बैलबुद्धी' माणूस 'बायकी' वृत्तीचा माणूस , घरकोंबडा , बायकोच्या तालावर नाचणारा माणूस हे तुच्छतेने शब्द एखाद्या स्त्रीला जोडीदार म्हणून साथ देणाऱ्या पुरुषासाठीची विशेषणे.
एखाद्या स्त्रीला एखाद्या वास्तूप्रमाणे 'माल ' वास्तुलाभ' 'कन्यादान' संबोधले जाते. भांडणातील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे 'शिव्या' . कोण कोणाला आई वाहिनीवरून सर्वात वाईट शिव्या देतो ह्यावरून लोकांमध्ये जणू चढाओढच असते.
सहज बोलता बोलता आपण जेव्हा स्त्रीला कमी, तुछ , धोकादायक , मोहाकडे नेणारी , माल , वगैरे समजतो आणि तसे शब्दप्रयोग करतो तेव्हा प्रत्येक ताशा घटनेतून स्त्रीच माणूसपण , स्त्रीच समानपणाचा ऱ्हास होत असतो .
स्त्री हि पुरुषांप्रमाणेच एक मनुष्य आहे. तिला स्वतःच अस्तित्व आहे आणि ती कोणती वस्तू नाही तर तिला भावना आहेत ह्याचे भान ठेवले पाहिजे . मानुष्यजातीचे अस्तित्व हे पुरुष आणि स्त्री ह्यांच्यावर अवलंबून असे. स्त्रीविना हे जग, देश , समाजच नाही तर कुटुंबही शक्य नाहीच.
🔹'पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व , स्वभाव , त्याची विचारपद्धती यांचे दर्शन होते' हे विधान सानेगुरुजीच्या सुंदर पात्रांमधील लेखावरून स्पष्ट करा.
उत्तर:
'पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व , स्वभाव, त्याची विचारपद्धती यांचे दर्शन होते' हे विधान सानेगुरुजींचा लिहिलेल्या सुंदर पात्रांमधील लेखावरून स्पष्ट होते.
पत्राच्या सुरुवातीला साने गुरुजींनी लिहिलेले पत्र मिळाल्याचे आणि ते वाचून आनंद झाल्याचे सांगतात तसेच हे सांगत असतांना काही लोकांची पत्रे किती वाईट अक्षरांत लिहिलेली असतात.
सही तर स्वतः ब्रह्मदेवाला सुद्धा उलगडणार नाही असा विनोद सानेगुरुजी करतात ह्यावरून सानेगुरुजी जरी काटकसरी असले तरी, त्यांच्यातला विनोदीपणा पत्र वाचणाऱ्याला स्मितहास्य करायला लावणारा नक्कीच असतो.
सानेगुरुजी छापखान्यात खिळे जुळविणाऱ्या कामगारांची व्यथा सांगताना खराब अक्षरांमुळे त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात ह्याची जाणीव करून देतात.
जरी सानेगुरुजी विनोदी असले तरीही त्यांचे व्यक्तिमत्व हे कष्टकरी लोकांच्या व्यथा समजून घेणारे संवेदनशील असल्याचे जाणवते.
हे समजावून सांगताना साने गुरुजी मनुष्याचा आयुष्यात धर्माचे स्थान आणि त्यामागील तत्वज्ञान काय हे पटवून देतात.
खराब अक्षर लेखनामुळे अक्षर लावता लावता खूप कष्ट घ्यावे लागतात. जो मनुष्य दुसर्यांचा विचार करतो, स्वछ लिहितो त्याच्या आयुष्यात धर्म येऊ लागतो.
नंतर साने गुरुजी धर्माची खरी व्याख्या काय? ते आणि पारंपरिक व्याख्येशी वेगळी कशी? ह्याचे तत्वज्ञानाशी सांगड घालून विवेचन करतात ह्यावरून सानेगुरुजीची विचारपद्धती हि प्रगतिशील व पुरोगामी असल्याची दिसून येते.
सानेगुरुजी आपले विचार व्यक्त करतांना धर्म म्हणजे समुद्रात अंघोळ करणे , वडावर जाणे नसल्याचे सांगतात कारण ह्यात जरी धर्माच्या नावावर क्रियाकर्म केले जात असले तरीही ह्यात दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या भावना, सुखदुःख पाहणे हे नसते उलट सानेगुरुजी विनोदीपणे अमेरिकन लेखकाचे उदाहरण देत जुगार खेळणे धर्ममय असल्याचे गमतीने सांगतात कारण त्यात आपण आपल्या सवंगड्याचा विचार करत असतो.
महत्वाचे म्हणजे सानेगुरुजी विनोदातून चांगल्या विचारांना प्रोत्साहन देताना दिसतात. त्यातून त्यांचे सखोल विचार, विनोदी स्वभाव व पुरोगामी विचारसरणी सर्व स्पष्टपणे दिसून येते.
सानेगुरुजी पुढे सुधास लिहितांना शाळेतील वाचनाच्या कार्यक्रमात सुधाच्या गटाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करतात पण तसेच ते सुधाला जाणवत असणाऱ्या घुसमट पणाला सुद्धा जाणतात.
लेखकाला वाचकाच्या मनातील भावना जाणवत असतात असेच काही सानेगुरुजीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल दिसून येते. सुधाला वाचन कसे करायचे कि जुंमुळे वाचनाचा पुरेपूर आनंद कसा घेता येईल ह्याचे मार्गदर्शन सानेगुरुजी एकदम थोडक्यात पण सोप्या शब्दांत समजावून सांगतात.
वाचन हे लेखकाच्या भावना आणि विचाराप्रमाणे असले पाहिजे वाचताना लेखक ज्याप्रमाणे जाणवतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा त्या गोष्टी जाणवल्या पाहिजे तर आवाज गंभीर असला तर गंभीर, खेळकर असला तर खेळकर इत्यादी व्हायला हवा हे सर्व सांगताना एका लेखकासोबत एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व आपल्याला जाणवते.
सानेगुरुजी जरी वाचनाचे पुरस्कर्ते असले तरीही ते खेळाचे महत्व जाणतात. खेळाची गम्मत हि महत्वाची आहे जरी नंबर मिळाला नाही तरीही! ह्यातून सानेगुरुजी खेळाडू वृत्तीला जिंकण्यापेक्षा अधिक महत्व देतात कारण खेळ हि वस्तू आहे असे ते मानतात.
पुढे ते आषाढ महिन्याच्या शेवटी येणारा भरपूर पाऊस आणि त्या पावसामुळे दुष्काळातील सुटकेमुळे मूळ्नार आनंद व्यक्त करतात ह्यावरून त्यांचे देशप्रेम व देशाप्रती असलेली कळवळ दिसून येते.
जरी आपण अन्न, वस्त्र ह्या बाबतीत परावलंबी असलो तरीही आपण स्वावलंबी झालो पाहिजे असा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या पत्रात दिसून येतो.
सानेगुरुजी शेतीला फक्त शेतीच नाही तर भेदाभेद नष्ट करण्याचे साधन म्हणून बघतात. ह्यावरून त्यांची वैचारिक प्रगल्भता जाणवते. माणसे जरी वेगवेगळी असली तरीही संकटाच्या वेळी कशी एक होतात हे सानेगुरुजी आपल्या दुष्काळातील निरीक्षणावरून सांगतात.
त्यांच्या प्रत्येक निरीक्षणाच्या मागे कुठे ना कुठे तत्वज्ञान असल्याचे आढळते. ढगातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या प्रकाशाप्रमाणे आपले मन अंधाराशी, निराशाशी झगडत असते पण प्रकाश हा अधून मधून बाहेर पडतच असतो ह्यातून वैचारिकपणा जाणवतो.
सानेगुरुजी आपल्या पात्रातून खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात सोबतच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याला थोडी विनोदाची जोडी असा सुंदर लेख त्यांच्या विचारपद्धती, व्यक्तिमत्व आणि स्वभाव ह्याने पुरेपूर दिसून येतो.
भाषेच्या वापरातून व्यक्तीचं समाजातील स्थान किंवा दर्जा आपोआप व्यक्त होत असतो. श्रीमती आशा मुंडले ह्यांनी या भाषापर निरीक्षणांचा उपयोग करून समाजातील स्त्री - पुरुष समानतेचा खरपूस समाचार ह्या लक्षणातून घेतला आहे.
स्त्री - पुरुष समानतेच्या जरी आपण बढाया मारत असलो तरीही हा समाज पितृसत्ताक आहे आणि ह्यात स्त्रीला दुय्यम लेखले जाते हे त्रिवार सत्य आहे आणि हे लपविता येत नाही ये त्यांनी लय लेखातील स्त्रीच्या उदाहरणावातून स्पष्ट केलेले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखाद्या स्त्रीसाठी किती खालच्या पातळीचे शब्दप्रयोग करतो हे त्या आक्रमकतेने निदर्शनास आणून देतात.
लेखिका सांगतात , कि भाषेला जरी कवींनी 'आई' म्हटले असले तरीही त्याच भाषेचा उपयोग दुसऱ्या स्त्रीला हिणविण्यासाठी केला जातो. लेखिका पुढे सांगतात कि त्यांनी इंग्रजीत एका बाईचे वर्णन 'सेक्सी बिच ' असं वाचलं होत. त्यावेळेस त्या सांगतात कि , मराठीत, रागात प्रत्युत्तर म्हणून 'काय रे! तुला आई बहीण आहेत कि नाही?' असे विचारतो पण त्यातही 'बायको' हा शब्द नसतोच म्हणजे लेखिका निदर्शनास आणून देतात कि, जरी आपण आई बहीण ह्यांच्याप्रमाणे दुसऱ्या स्त्रीला आदराची अपेक्षा करत असलो तरीही ती अपेक्षा आपण बायकोसाठी करत नाही.
🔹स्वल्पविरामचिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
०१. जे वाक्य सरळ आहेत त्यात विरामचिन्ह घालण्याची गरज नाही. मला अभ्यास करायला आवडते. ती पुस्तक वाचते. तू कोणते पुस्तक वाचतोस? किती मोठा हा संग्रह! हि वाक्ये सरळ आहेत ह्या वाक्यांचे विभाग नाहीत ह्या उदाहरणांत पहिल्या दोन वाक्यांत पूर्णविराम नंतरच्या वाक्यात प्रश्नचिन्ह व त्यानंतरच्या वाक्यात उद्गारचिन्ह पाहिजे.
०२. सरळ वाक्यांमध्ये जर दुसरे वाक्य किंवा वाक्यांश आले, तर त्या वाक्यांच्या किंवा वाक्यांशाच्या आरंभी व शेवटी स्वल्पविरामचिन्ह पाहिजे. एक मुलगा, इतर मुलांना सोबत घेऊन, झाडे लावू लागला. येथे, एक मुलगा झाडे लावू लागला हे वाक्य सरळ आहे त्यामध्ये संबंधाचे इतर मुलांना सोबत घेऊन हे दुसरे वाक्य आहे आहे; म्हणून वाक्यांच्या मागे आणि पुढे स्वल्पविराम पाहिजे
०३. जी दोन-तीन सरळ वाक्ये मिळून एक मोठे वाक्य होते त्या त्या त्या वाक्यांच्या मध्ये स्वल्पविराम पाहिजे . विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आलात, झाडे लावलेत, आनंद झाला.
०४. एकाच प्रकारचे दोनपेक्षा अधिक शब्द आले त्या प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविरामचिन्ह पाहिजे. उदाहरणार्थ, मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न ,वस्त्र, निवारा आणि इंटरनेट गरजेचे आहे.
०५. कोणत्याही एका प्रकारच्या दोन शब्दांमध्ये उभयान्वयी अव्यय आले असता, त्या शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम नको. उदाहरणार्थ, राम आणि श्याम दोघे भाऊ आहेत. येथे राम आणि शाम हे दोन एकाच प्रकारचे शब्द आले आहेत. ह्यांच्यामध्ये आणि हे उभयान्वयी अव्यय आले आहेत म्हणून ह्या दोन नामांच्या मध्ये स्वल्पविराम नको.
०६. वाक्याच्या आरंभी संबोधन असता, त्याच्या पुढे स्वल्पविराम चिन्ह पाहिजे; आणि ते मध्येच आले असता त्याच्या मागे व पुढे स्वल्पविराम पाहिजे. गुरुजी, मला माफ करा. येथे गुरुजी हे संबोधन आरंभी आहे म्हणून ह्याच्या पुढे स्वल्पविराम पाहिजे.
०७. असता शब्द असताना इत्यादी शब्द वाक्यात आले, तर त्याच्या पुढे कधी कधी स्वल्पविराम पाहिजे. मी घरी जात असता, रस्त्यात चावी हरवली.
०८. संबंधी सर्वनामे व ते ज्याचा ज्याचा संबंध दाखविते ते पुरुषवाचक किंवा दर्शक सर्वनाम, हि दोन सर्वनामे वाक्यांमध्ये आली व त्यांच्यामध्ये दुसरे शब्द आले आहेत तर, त्या पुरुषवाचक सर्वनामामागे, किंवा दर्शक सर्वनामामागे, स्वल्पविरामचिन्हं पाहिजे. जे पुस्तक तुम्ही विकत घेतले, ते मनोरंजक आहे.
०९. परंतु जर संबंधी सर्वनाम व पुरुषवाचक सर्वनाम ह्यांच्यामध्ये दुसरे शाब्द आले नाहीत, तर पुरुषवाचक सर्वनामामागे स्वल्पविरामचिन्ह नको.
१०. आणि, तर, परंतु, इत्यादी अव्यये वाक्यांगांच्या मध्ये आली असता त्या प्रत्येक अव्ययाच्या मागे स्वल्पविरामचिन्ह पाहिजे. जर पाऊस आला, तर कपडे भिजणार. मला पुस्तक हवे होते, पण आता नको.
११. की, हे अव्यय वाक्यांत आले असता, त्याच्या संबंधांप्रमाणे त्यांच्या मागे, किंवा पुढे, स्वल्पविरामचिन्ह पाहिजे. उदाहरणार्थ, तो म्हणाला कि, मी आज शाळेत येऊ शकत नाही.
१२. कोणाचे म्हणणे किंवा लेख वाक्यात घेतले असता त्या म्हणण्याच्या किंवा त्या लेखाच्या प्रारंभी स्वल्पविरामचिन्हं पाहिजे.
१३. एका मनुष्याची किंवा वस्तूची दोन नामे आली असता व त्यापैकी कोणत्याही नापास दुसरे शब्द जुळले असता, त्या प्रत्येक नामाच्या पुढे स्वल्पविराम पाहिजे.
१४. परंतु एकही नापास दुसरा शब्द जोडला नाही, तर स्वल्पविराम चिन्ह नको.
0 Comments